साखर कारखाना निवडणूक: अपात्र उमेदवारांबाबत उद्या पुढील सुनावणी

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २९ जणांची उमेदवारी रद्द झाल्याप्रकरणी मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. पुढील सुनावणी उद्या होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी विरोधी आघाडीतील या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले आहे. यापैकी बहुतांश उमेदवारांना काँग्रेसचे बलाढ्य नेते सतेज पाटील यांचे पाठबळ आहे.

उमेदवारांनी अपिलिय अधिकारी एन. व्ही. गाडे यांच्याशी संपर्क साधला होता. गाडे हे सहकारी समितीचे विभागीय संयुक्त संचालक आहेत. गाडे यांनी मंगळवारी सुनावणी निश्चित केली आणि राजाराम साखर कारखान्याला या प्रकरणात पक्षकार बनवले आहे. सतेज पाटील यांच्या पॅनलचे नेतृ्त्व करणाऱ्या मोहन सालपे यांनी सांगितले की, कारखान्याच्या वकिलांनी आपली भूमिका मांडण्यासाठी पुरेशी वेळ मागीतली आहे. सुनावणी गुरुवारीही सुरू राहील. आम्ही त्याच दिवशी निकालाची अपेक्षा करतो. कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांची उमेदवारीही रद्द करण्यात आली आहे. ते म्हणाले की, ज्यांना अपात्र ठरवले आहे, असे उमेदवार वरिष्ठ सदस्य आहेत. सुनावणीला उशीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही उमेदवारांनी सांगितले की, वेळेवर सुनावणी पूर्ण झाली नाही तर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये अनुभवहीन उमेदवार उरतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here