लॉकडाउन नंतर अधिकारी आणि मंत्र्यां बरोबर ऊस थकबाकी मुद्यावर चर्चा करु: राजू शेट्टी

कोल्हापुर: देशात लॉक डाऊनमुळे साखर विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. साखर विक्री ठप्प झाल्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती गडबडली आहे. यामुळे ते ऊस थकबाकी भागवण्यात अपयशी झाले आहेत. देशातील दोन साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अजूनही ऊस बिल भागवणे बाकी आहे.

कोरोना मुळे मार्च आणि एप्रिल मध्ये साखर कारखान्यांचा कारभार जवळपास ठप्पच राहिला. इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA) नुसार लॉक डाऊन मुळे मार्च आणि एप्रिल मध्ये साखरेच्या विक्रीत 10 लाख टन इतकी घट झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये ऊस शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, लॉक डाउन नंतर लवकरच अधिकारी आणि मंत्र्यांबरोबर ऊस थकबाकीच्या मुद्यांवर चर्चा करू.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here