शेतातील प्रत्येक ऊसाचे गाळप होईपर्यंत ते साखर कारखाने बंद होऊ देणार नाही: राकेश टिकैत

मुजफ्फरनगर : भाकियू चे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी सांगितले की, शेतातील प्रत्येक ऊसाचे गाळप होईपर्यंत ते साखर कारखाने बंद होऊ देणार नाहीत. जर शेतकऱ्यांचा एक जरी ऊस शेतात राहिला तर तो डीएम किंवा कारखाना अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तोलला जाईल, असा इशाराही टिकैत यांनी दिला.

ऊस शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरुन मंसूरपुर शुगर मिल मध्ये पोचलेल्या चौधरी राकेश टिकैत यांनी साखर कारखाना उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित व केन मैनेजर बलधारी सिंह यांच्यात मोठी चर्चा झाली. कारखाना अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे बेसिक कोटया पेक्षा अधिक शेतातील ऊसाचा सर्वे केला आहे. लवकरच शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जातील. कारखाना अधिकाऱ्यांनी पुढील 10 जूनपर्यंत पूर्ण ऊसाचे गाळप होण्याची शक्यता वर्तवली. राकेश टिकैत यांनी, पाच दिवस कारखाना मुक्त करुन 15 जूनपर्यंत चालवावा लागला तरी शेतकऱ्यांचा एक – एक ऊस घेण्याची मागणी केली आहे.

कारखाना अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्ण ऊस गाळप करण्याचे आश्वासन दिले. राकेश टिकैत यांनी साखर कारखान्यात ऊस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या समस्यांबाबत विचारले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कारखान्यात टीन शेड आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याबाबत सांगितले. त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्याचे सांगितले. दरम्यान चांदवीर सिंह, युवा भाकियू नेता मोहित बालियान, विकास बालियान, संजीव राठी, प्रभात राठी, जगपाल जोहरा, सुबोध प्रधान, राजेश्वर आर्य, अमित राठी व कुलबीर आदि उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here