ऊस शेतकऱ्यांच्या प्रलंबित थकबाकी बाबत कारवाई करण्यासाठी आवश्यक आदेश दिले गेले: रामविलास पासवान

 

नवी दिल्ली: कोरोना संकटा ने ना केवळ साखर कारखाने, व्यापारी, इतकेच नाही तर ऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सरकार देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर थकबाकी भागवण्याच्या मुद्यावर काम करत आहे.

आज केंद्रीय खाद्य ग्राहक मंत्री रामविलास पासवान यांनी सचिव तसेच अन्य अधिकाऱ्यांबरोबर साखर उत्पादन, ऊस थकबाकी, इथेनॉल उत्पादन आदी विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, या हंगामात 270 लाख टन साखर उत्पादनाची शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये पासवान यांनी ऊस थकबाकी बाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि प्रलंबित बाकी भाागवण्याच्या दिशेने कारवाई करण्याचे आदेश दिले.

पासवान यांनी ट्वीट केले की, “आज सचिव तसेच अन्य अधिकाऱ्यांबरोबर साखर उत्पादन, ऊस शेतकऱ्यांची प्रलंबित थकबाकी, इथेनॉल उत्पादन सारख्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या वर्षी 270 लाख टन साखर उत्पादनाची शक्यता आहे.”

सध्या, देश भरातील साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मे 2020 दरम्यान 268.21 लाख टन साखर उत्पादन केले आहे. हे गेल्या वर्षी 31 मे 2019 पर्यंत उत्पादित 327.53 लाख टनापेक्षा 59.32 लाख टनाने कमी आहे. 31 मे 2019 ला ऊस गाळप करणाऱ्या 10 साखर कारखान्यांच्या तुलनेत, या वर्षी 31 मे 2020 ला 18 साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here