रमाला साखर कारखान्याने विकली 15 करोडची विज

रमाला (बागपत) : सहकारी साखर कारखाना रमाला ने यावेळी विज विक्रीपासून 15 करोड रुपये अतिरिक्त कमावले आहेत . उत्तम ग्रुप चे मुख्य डायरेक्टर  संजय गुलाटी यांनी सांगितले की, कारखान्याची क्षमता वाढल्यानंतर आणि नव्या को जनरेशन प्लांट चालू झाल्यामुळे विजेचे उत्पादन करुन 15 करोड रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न  कमावले आहे. उपाध्यक्ष हरनाम सिंह यांनी सागितले की, गाळप हंगाम 2019-20 मध्ये कारखान्याने 83 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करुन 9 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. गेल्या गाळप हंगामापेक्षा 4.60 लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. त्यांनी सांगितले की, विस्तारीकरणा  बरोबरच 27 मेगावॅट चा को जनरेशन प्लांटही स्थापन केला आहे. यामध्ये 37468 मेगावॅट विजेचे उत्पादन झाले,या विजेला  विद्युत पावर ग्रीड ला निर्यात करुन 15 करोड रुपये अतिरिक्त कमावले आहेत. उत्तम ग्रुप चे साइट व्यवस्थापक अश्‍वनी तोमर, रमाला कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आर बी राम यांनीही याबाबत मत व्यक्त केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here