बिलासपूर : प्रदेशाचे जलशक्ति राज्यमंत्री बलदेव सिंह औलखयांनी अचानक रुद्र बिलास साखर कारखान्याला भेट दिली. सर्वेक्षणादरम्यान, त्यांना कारखान्यात ठिकठिकाणी कचरा दिसला. यामुळे संतापून त्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले.
सोमवारी रुद्रपूरला जाताना राज्यमंत्र्यांनी अचानक साखर कारखान्याला भेट दिली. त्यांना कारखान्यात पाहून अधिक़ार्यांच्यात गडबड उडाली. त्यांनी कारखान्याच्या परिसराचे निरीक्षण केले. त्यांना ठिकठिकाणी कचरा दिसून आला. यामुळेसंतापून राज्यमंत्र्यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच कारखाना लवकरात लवकर साफ करण्याचे आदेशही दिले. तसेच घसरत्या साखर उताऱ्याबद्दल चिंता व्यक्त केली. कारखाना संचालक राजेश गुप्ता यांची भेट न झाल्यामुळे त्यांनी जीएम ना फोन करुन असलेल्या अडचणींसाठी लवकरात लवकर मार्ग काढावा असे निर्देश दिले. यावेळी पूर्व ब्लॉक प्रमुख कुलवंत सिंह औलख, संतोष सिंह सोखी, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सिंह खैहरा, क्रय विक्रय चे सभापती रवी यादव गुरुदेव सिंह आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.