महाराष्ट्राला उकाड्यापासून दिलासा, अनेक विभागात ढगाळ वातावरण

मुंबई : महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेपासून थोडा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पूर्ण आठवडाभर विविध ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. या काळात काही ठिकाणी पाऊसही पडू शकतो. मध्य महाराष्ट्रात याचा जास्त परिणाम दिसू शकेल. विदर्भात २५ आणि २६ मार्च या काळात पाऊस पडू शकतो. दुसरीकडे तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे. यापूर्वी जेथे मुंबईत कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते, ते सोमवारी ३३ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले. तर काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील.

राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश ठिकाणी समाधानकारक आहे. मुंबईत कमाल तापमान ३३ आणि किमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. आजपासून २५ मार्चपर्यत बहूतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३३ नोंदवला आहे. तो मध्यम श्रेणीत आहे. पुण्यात कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २१ डिग्री सेल्सिअस राहील. आज ढगाळ वातावरण राहील. हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान ३९ आणि किमान तापमान २१ डिग्री सेल्सिअस असेल. आज, उद्या हवामान साफ राहील. त्यानंतर २८ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहील. नाशिक आणि औरंगाबादमध्ये अशीच स्थिती राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here