उत्तराखंड: शेतकर्‍यांना दिलासा, कारखान्यांनी भागवली उस थकबाकी

रुडकी: लिब्बरहेडी साखर कारखान्याशी संबंधीत 22 हजार शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. साखर कारखान्याने 10 करोड ची थकबाकी भागवली आहे. यामुळे 30 एप्रिल पर्यंतची थकबाकी भागवली जाईल.

लिब्बरहेडी साखर कारखान्यामध्ये उस समिती चेअरमन प्रतिनिधी व निदेशक सुशील राठी च्या निर्देशनामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये सुशील राठी यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून थकबाकी भागवण्यात विलंब केला जात आहे. तसेच, उस खरेदी वाढवली जात नाही. यामुळे शेतकर्‍यांना उस पावत्या मिळत नाहीत. डिसेंबर तोंडावर आहे, पण शेतकरी उस तोडणी करुन गव्हाची लागवड करु शकत नाहीत. वजनात घट येण्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. जर वजनात घट आली तर संबंधीतांवर तात्काळ फिर्याद दाखल केली जाईल. यावर साखर कारखान्याचे प्लांट हेड लोकेंद्र लांबा यांनी सांगितले की, लवकरच शेतकर्‍यांना उसाचे पैसे दिले जातील. यासाठी 10 करोड रुपये जारी केले आहेत. याशिवाय उस खरेदी वाढवली आहे. सध्याच्या गाळप हंगामामध्ये शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची अडचण येवू दिली जाणार नाही. यावर सुशील राठी यांनी समिती सचिव जय सिंह यांना निर्देश दिले की, ते बैठकीमध्ये घेतलेल्या विषयांचे पालन करवावे. यावेळी समिती चे निदेशक ब्रजपाल सिंह, राजदीप सिंह, प्रेम सिंह, शेतकरी अनिल कुमार, मोहित चौधरी, राजवीर सिंह, पारुल कुमार, उस महाव्यवस्थापक अनिल सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here