शाहजहांपूर : रोजा साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी ग्रुपचे अॅडव्हायजर सी. बी. पटोदीया यांनी साखर कारखान्याची पाहणी केली. सद्यस्थितीत साखर कारखान्याची गाळप क्षमता ५० हजार क्विंटल प्रती दिन आहे. ती ६५,००० प्रती दिन करण्याची तयारी कारखान्याने सुरू केली आहे. कारखान्याच्या यार्डपासून यांत्रिक कामकाज वाढविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल.
कारखान्याच्या गळीत हंगामाचे सत्र समाप्त झाल्यानंतर लगेचच विस्तारीकरणाचे काम सुरू होईल. गाळप क्षमता वाढविण्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना तोडणी पावती लवकर मिळेल. शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. याशिवाय अतिरिक्त गाळप क्षमता वाढविल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. कारखान्याचे ग्रुप डायरेक्टरांनी यावेळी ऊस वजनाची पाहणी करून शेतकऱ्यांचीही भेट घेतली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष मुनेश पाल सिंह, उपाध्यक्ष ब्रजेश शर्मा, मुख्य इंजिनीअर इंद्रजित कालरा, अशोक मित्तल आदी उपस्थित होते.