पीलीभीत जिल्यातील साखर कारखान्यांकडून करोडो रुपये देय बाकी

पीलीभीत, उत्तर प्रदेश: जिल्ह्यामध्ये 2020-2021 गाळप हंगाम सुरु होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पण ऊस थकबाकी अजूनपर्यंत भागवण्यात आलेली नाही.

जिल्ह्यातील चार कारखान्यांपैकी तीन कारखान्यांकडून शेतकर्‍यांचे 136.19 करोड रुपये देय आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे राष्ट्रीय संयोजक वीएम सिंह यांनी शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबाबत सरकारला फटकारले. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर थकबाकी न भागवल्याबद्दल टिका केली. जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्रा यांनी सांगितले की, प्रशासन उर्वरीत ऊस थकबाकी भागवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here