कारखान्यांनी ऊस खरेदी केला आहे, तर बिलही भागवणार: सुरेश राणा

सहारनपूर : ऊस मंत्री सुरेश राणा म्हणाले की, जर प्रदेशातील साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांकडून ऊस खरेदी केला असेल तर त्याचे पैसेही वेळेतच भागवले जातील. पैसे न भागवणार्‍या साखर कारखान्यां विरोधात कडक कारवाई केली जाईल.

ऊस मंत्री सुरेश राणा यांनी रामपूर मनिहारान येथील आमदार देवेंद्र निम यांच्याशी चर्चा केली आणि विधानसभा क्षेत्रांतर्गत येणार्‍या शेतकर्‍यांची माहिती घेतली. आमदारांनी ऊस मंत्र्यांना सांगितले की, बजाज शुगर मिलकडून ऊसाचे पैसे देण्यात विलंब केला जात आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांसमोर आर्थिक समस्या उभी आहे. याबाबत माहिती घेवून ऊस मंत्री यांनी लवकरात लवकर ऊसाचे पैसे मिळतील, असे अश्‍वासन दिले. ते म्हणाले, जर प्रदेशातील साखर कारखाने ऊस खरेदी करत असतील तर त्याचे पैसेही भागवलें जातील. दरम्यान, आमदारांनी ऊस मंत्री राणा यांचे आभार मानले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here