ऊस शेतकर्‍यांनी केली संजीवनी वाचवा समितीची स्थापना

सांगुएम, गोवा: संजीवनी साखर कारखान्याच्या भविष्याबाबत सरकारच्या अस्पष्ट दृष्टीमुळे ऊस शेतकर्‍यांनी रविवारी संजीवनी वाचवा समिती ची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष बोशिओ सिमोस, कोषाध्यक्ष नेमु मडइकर आणि सचिव प्रशांत गवस देसाई यांनी सदस्य चंदा वेलिप आणि दयानंद फलदेसाई यांच्या उपस्थितीमध्ये समितीची घोषणा केली. सिमोस यांनी सांगितले की, जोपर्यंत सरकार संजीवनी कारखान्याच्या चालवण्याचा मुद्दा कायमस्वरूपी सोडवणार नाही, तोपर्यंत समिती पूर्ण गोवामध्ये ऊसाची शेती करणार्‍या शेतकर्‍यांबरोबर बैठक घेईल, जेणेकरुन त्यांना कारखान्याच्या परिस्थिती बाबत अवगत केले जावू शकेल.

सिमोस यांनी सांगितले की, समिती ने पंतप्रधान कार्यालयासह राज्य सरकारला निवेदन देवून सांगितले की, शेतकर्‍यांना एक विशिष्ट तारीख सांगावी जेव्हा वर्ष 2020-21 साठी संजीवनी कारखान्याकडून गाळप हंगाम सुरु होईल. समितीने आपल्या निवेदनात सरकारला गेल्या हंगामामध्ये पुरवठा करण्यात आलेल्या पीकाचे उर्वरीत पैसे लवकरात लवकर भागवण्याचेही आवाहन केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here