हंगाम २०२१-२२ : उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत १०१.१४ लाख टन साखर उत्पादन

उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन १०० लाख टनावर पोहोचले आहे. राज्यातील गळीत हंगाम २०२१-२२ आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आणि गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी झाले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, १३ मे २०२२ पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ९९९.७५ लाख टन उसाचे गाळप करुन १०१.१४ लाख टन साखर उत्पादन केले आहे. आणि सध्याच्या गळीत हंगामात ऊस बिले देण्याबाबत पाहिले तर २४,६८८.४४ कोटी रुपये म्हणजे ७३.२८ टक्के पैसे देण्यात आले आहेत. गेल्या हंगामात राज्यात १०२७.५० लाख टन ऊस गाळप करुन ११०.५९ लाख टन साखर उत्पादन घेण्यात आले होते. गेल्या हंगामातील शंभर टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत. प्रशासनाने चालू गळीत हंगामातील ऊसाचे पैसे गतीने दिले जावेत यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

राज्य सरकारने थकीत ऊस बिले गतीने मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी अधिकारी तसेच साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना थकबाकी देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच साखर कारखान्यांना देखभाल, दुरुस्तीचे काम गुणवत्तेच्या आधारावर व निकषानुसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here