हंगाम २०२१-२२ : उत्तर प्रदेशात आतापर्यंत १०२.४८ लाख टन साखर उत्पादन

लखनौ : उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम समाप्तीच्या मार्गावर आहे. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून लवकरात लवकर पैसे दिले जातील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

उत्तर प्रदेशात साखर उत्पादन १०० लाख टनांपेक्षा अधिक झाले आहे. राज्यात २०२१-२२ हा गळीत हंगाम सत्र समाप्तीच्या वाटेवर आहे. आणि साखर उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे.

३ जून २०२२ अखेर राज्यातील साखर कारखान्यांनी १०१४.७६ लाख टन ऊस गाळप करून १०२.४८ लाख टन साखर उत्पादीत केली आहे. गेल्या हंगामात राज्यात १०२७.५०लाख टन ऊस गाळप करून ११०.५९ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली होती.

सरकारी आकडेवारीनुसार ३ जून २०२२ पर्यंत सध्याच्या गळीत हंगामात आतापर्यंत २६,६३०.४० कोटी रुपये म्हणजेच ७६.०७ टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत.

गेल्या गळीत हंगामात जवळपास शंभर टक्के ऊस बिले शेतकऱ्यांना मिळाली आहेत. आणि आताही प्रशासनाने चालू गळीत हंगामातील ऊस बिले तातडीने दिली जावीत असे प्रयत्न चालवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here