हंगाम २०२२-२३: महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून ऊस बिलांबाबत चांगली कामगिरी

पुणे : महाराष्ट्रातील यंदाचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे आणि साखर कारखाने ऊस बिले (FRP) देण्यास गती आली आहे.

साखर आयुक्त कार्यालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, चालू हंगामात २१० साखर कारखान्यांनी सहभाग घेतला होता. आणि यापैकी १०१ कारखान्यांनी शंभर टक्के बिले अदा केली आहेत. तर ८० कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के यांदरम्यान ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. १९ कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के बिले दिली आहेत. तर १० कारखान्यांनी ० ते ६० टक्के पैसे अदा केले आहेत.

राज्यात या हंगामातील एकूण ३३,२७८ कोटी रुपयांपैकी ३२,९७९ कोटी रुपये ऊस बिलापोटी (९९.१० टक्के) देण्यात आले आहेत.

या हंगामात राज्यात १,०५२ लाख टन ऊस गाळप करुन १०५ लाख टन साखर उत्पादन करण्यात आले आहे.
राज्यात ८ साखर कारखान्यांना RRC जारी करण्यात आली आहे. आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत उसाचे पैसे देण्यात महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here