शाहाबाद: शेतकऱ्यांच्या गोंधळानंतर कारखाना दहा तास बंद, पुन्हा गाळप सुरू

कुरुक्षेत्र : उसाच्या वजनावर आक्षेप घेऊन शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याने सहकारी साखर कारखान्याने सकाळी १० वाजता उसाचे वजन बंद केले. त्यानंतर गाळप ठप्प झाले. अखेरीस रात्री आठ वाजता पुन्हा गाळप सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांनी उसाच्या वजन काट्यावर आक्षेप घेऊन कामकाज बंद पाडले होते असे कारखान्याचे कार्यकारी संचालक विरेंद्र चौधरी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या गोंधळामुळे उसाची तोलाई बंद पडली. परिणामी गाळप ठप्प झाले. कारखाना व्यवस्थापन समितीने वजनकाटे विभागाच्या अम्बाला येथील सहाय्यक निरीक्षकांना पत्र तसेच फोनद्वारे वजन काटा पाठिण्यास सांगितले. वजनमापे निरीक्षक कुलदीप राणा यांनी दुपारी कारखान्यात वजनकाट्याची तपासणी केली.

त्यानंतर अम्बाला येथून वेट कॅलिबर मशीन उपलब्ध करण्यात आली. त्यांच्याकडून सर्व वजनकाट्याचे परीक्षण करण्यात आले. त्यात कोणताही अनियमितता आढळली नाही. त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा गाळप सुरू करण्यात आल्याचे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here