टोळ दलावर सर्जिकल स्ट्राइक साठी ब्रिगेड सज्ज

शाहजहांपूर :शेजारील जिल्हा बदायूंमध्ये टोळ दलाची हालचाल पाहून प्रशासन पूर्णपणे कटीबद्ध झाले आहे. सर्व क्षेत्रीय विभागीय कर्मचार्‍यांना हाय अलर्ट मोडवर आणले आहे. सोमवारी डीएम यांनी जिल्हाधिकारी सभागृहामध्ये उप कृषी निदेशक डॉ. अनिल कुमार तिवारी, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. सतीश चंद्र पाठक, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. शिव शंकर गौतम, जिल्हा उद्यान अधिकारी मुकेश कुमार यांच्या बरोबर बैठक घेतली. सर्वांना टोळ नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. एडीएम प्रशासन रामसेवक द्वीवेदीयांना जिल्हा कृषी रक्षा अधिकारी यांनी केलेल्या तयारी बाबत अवगत केले. हवेची दिशा दिल्लीकडे असल्यामुळे टोळ दल बदायूं, फर्रुखाबाद पासून शहांजहांपूरकडे जावू शकले नाही. जिल्हा कृषी रक्षा अधिकारी डॉ. शिवशंकर गौतम यांनी सांगितले की, पाच फायर ब्रिगेड, 450 ट्रॅक्टर माउंटेड स्प्रे ची फवारणी टोळ दलावर केली जाईल.

जिल्हा कृषी अधिकारी डॉ. सतीशचंद्र पाठक यांनी सांगितले की, दोन दलांमध्ये समूह वाटला गेल्यामुळे शेजारील जिल्ह्यामध्ये आलेल्या दलामध्ये जवळपास 50 लाख टोळ सामिल आहेत. जवळपास 500 मीटरची त्रैज्यिक क्षेत्राला हे दल कव्हर करुन घेईल. टोळ दल आल्यावर अंधार होईल. अशामध्ये शेतकर्‍यांनी घाबरण्याऐवजी गोंधळ करुन त्यांना खाली उतरु देवू नये. साखर कारखान्यानेही तयार केलेले मशीन अपर मुख्य ऊस विकास आणि साखर उद्योग संजय आर भूसरेड्डी यांनी देखील टोळ नियंत्रणासाठी माहिती उपलब्ध केली आहे. त्यांच्या आदेशावर डीसीओ डॉ. खुशीराम यांनी साखर कारखान्यांशी चर्चा करुन 192 कर्मचार्‍यांना टोळ नियंत्रणाची जबाबदारी सोपवली आहे. केमिकल अटॅक साठी मशीन आणि ब्रिगेडला सावध केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here