शामलीत जिल्हाधिकाऱ्यांचा कारखान्यांना सख्त इशारा, गतीने थकबाकी न दिल्यास कारवाई

शामली : जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी साखर कारखान्यांना थकबाकी देण्यासाठी ३० नोव्हेंबरची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत जर शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले गेले नाहीत, तर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी २०२०-२१ या गळीत हंगामातील व्यवस्थापनाबाबतही विशेष निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी जसजित कौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आधीच्या गळीत हंगामातील थकबाकीबाबतची आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शामली कारखान्याकडे ३६६.४६ कोटींच्या तुलनेत२८३.२५ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. ऊन साखर कारखान्याने ३३७.१० कोटींच्या तुलनेत २७२.६७ कोटी तसेच थानाभवन कारखान्याने ४३९.४० कोटींच्या तुलनेत २६२.२८ कोटी रुपये दिले आहेत. उर्वरीत थकबाकी त्वरीत द्यावी असे त्यांना बजावण्यात आले. या थकबाकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कारखान्यांनी गतीने ऊस बिले द्यावीत, अन्यथा कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी बजावले.

बैठकीला जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह, शामली कारखान्याचे कुलदीप पिलानिया, महाव्यवस्थापक विजित जैन, थानाभवन कारखान्याचे अकाउंट हेड वीरपाल सिंह,जे. बी. तोमर, अनिल कुमार अहलावत, विक्रम सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here