शामली साखर कारखान्याचे गाळप सुरू

शामली : अप्पर दोआब साखर कारखान्यात नव्या गळीत हंगामाला सोमवारी प्रारंभ करण्यात आला. कारखान्याच्या परिसरात असलेल्या राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक लाला रजत लाल, त्यांच्या पत्नी पूजन लाल, अधिकारी आणि शेतकऱ्यांनी गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाला सुरुवात केली.

कार्यकारी संचालकांनी कारखान्यात सर्वात आधी उसाची बैलगाडी घेऊन आलेले शेतकरी ब्रजपाल लिलौन, सह संचालक राहुल लाल यांनी शेतकरी सत्यव्रत लिलौन, सीओओ आर. बी. खोखर, सरव्यवस्थापक डॉ. कुलदीप पिलानिया यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आलेले शेतकरी राजीव कुमार टिटौली, शेतकरी अनित राणा खेडीकरमू, ट्रकचालकाला एजीएम करणपाल सरोहा, सरव्यवस्थापक दीपक राणा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ऊस विभागाचे महाव्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले की, कारखाना दुपारी तीन वाजता सुरू करण्यात आला. संध्याकाळपर्यंत १५ हजार क्विंटल ऊस पुरवठा करण्यात आला. यावेळी पी. के. श्रीवास्तव, अनिल गुप्ता, पंकज अग्रवाल, अखिलेश गुप्ता, ऊस समितीचे माजी अध्यक्ष मनोज कुमार, वीर सिंह मलिक, लवली मलिक उपस्थित होते.

गाळप पूजनानंतर थानाभवन साखर कारखान्यात उसाचे गाळप करण्यात आले. कारखान्याची प्रती दिन क्षमता ९० हजार क्विंटल आहे. मात्र १२ हजार क्विंटल उसाचे गाळप करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे युनिट हेड वीरपाल सिंह, ऊस महा व्यवस्थापक जे. बी. तोमर यांनी सागितले. कारखाना नियमीतपणे सुरू रहावा यासाठी खरेदी केंद्रावर ऊसाचे वजन करण्याच्या कामाची गती वाढविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here