श्री रेणुका शुगर्सला लवकरच इथेनॉल उत्पादन क्षमता वाढीची अपेक्षा

नवी दिल्‍ली : सिंगापूरस्थित विल्मर ग्रुपच्या मालकीची श्री रेणुका शुगर्सला मार्चच्या तिमाहीत ७२० केएलपीडीच्या आपल्या इथेनॉल उत्पादन क्षमतेला १२५० किलो लिटर प्रती दिन (केएलपीडी) पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कंपनीला अपेक्षा आहे की, रिफायनरीचा व्यवसाय वगळता त्यांच्या महसुलात इथेनॉलचे योगदान जवळपास ४० टक्के आहे. श्री रेणुका शुगर्सचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी बिजनेसलाइनला सांगितले की, इथेनॉलची मागणी मजबूत आहे आणि जर उद्योग इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी ४.५-५ मिलियन टन साखरेचा वापर केला जात असले तर यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे असे काहीच नाही.

कंपनीची विस्तारीत क्षमता या महिन्याच्या अखेरीस अथवा फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत उत्पादन सुरू करले. आणि डिसेंबरच्या तिमाही पासून याची वाढलेली आकडेवारी पाहायला मिळू शकेल. चतुर्वेदी यांनी सांगितले की, सध्याच्या साखर हंगामादरम्यान, सध्याचा इथेनॉल प्लांट ९०० केएलपीडीने उत्पादन करीत आहे. यापू्र्वी याची क्षमता ७५० केएलपीडी होती. त्यापेक्षा अधिक गाळप केले जात आहे.

त्यांनी सांगितले की, आतापर्यंत साखर उद्योगाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता, कारण, यामध्ये फक्त ४-५ महिने उसाचे गाळप केले जात होते. आणि १०-१२ महिन्यांसाठी साखर साठा ठेवावा लागत होता. ते म्हणाले की, इन्व्हेंट्रीवर व्याजाचा बोजा होता. मात्र, आता गळीत हंगामादरम्यान ऊसाच्या रसाला इथेनॉलमध्ये बदलण्यात येत आणि ऑफ सीझनमध्ये साखरेला इथेनॉलमध्ये रूपांतरित केले जावू शकते. सरकारसाठी ग्रीन इथेनॉलचा पुरवठा आणि अनुदानाशिवाय ऊस बिले देण्याचा दुहेरी उद्देश पूर्ण झाल्याने साखर क्षेत्र आता चांगल्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here