भारताच्या साखर निर्यात निर्बंधाबाबत सिंगापूरची प्रतिक्रीया

सिंगापूर : देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच साखर निर्यातीवर निर्बंध लागू करण्याच्या भारताच्या निर्णयाबाबत सिंगापूरने प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. सिंगापूरमधील ग्राहकांनी साखर पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त करण्याची गरज नाही असे या देशाने म्हटले आहे. John Cheng, a director at sugar manufacturing business Cheng Yew Heng यांनी म्हटले आहे की, कंपनी थायलंड, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतून साखर आयात करते. भारताकडून होणारी आयात ५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे भारताच्या निर्बंधांचा सिंगापूरच्या देशांतर्गत बाजारावर नकारात्मक परिणाम होणार नाही. चेंग यू हेंग कंपनी साखरेची मुख्य आयातदार आणि देशातील सर्वात जुनी साखर उत्पादक कंपनी आहे.

साखर आयातदार हियांग ली ट्रेडर्सचे प्रवक्ते म्हणाले की, सिंगापूर मुख्यत्वे थायलंड आणि मलेशियाकडून साखरेची आयात करतो. प्रवक्ते म्हणाले की भारताकडून किरकोळ प्रमाणात साखरेची आयात होते. त्यामुळे वास्तवात भारताकडून निर्यात निर्बंध लागू केल्यानंतर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. सिंगापूर फूड एजन्सीचे (एसएफए) प्रवक्ते म्हणाले की, आम्ही ऑस्ट्रेलिया, भारत, मलेशिया, थायलंडसह ४० हून अधिक देशांकडून साखर आयात करतो. सिंगापूर येथे साखरेच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here