साखर कारखान्याने भागवली थकबाकी

महराजगंज :आईपीएल साखर कारखाना सिसवा ने जिल्ह्यातील जवळपास 2300 शेतकर्‍यांची चार करोड 66 लाख रुपयांची ऊस थकबाकी भागवली आहे. थकबाकी मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे, तर अजूनही 21.37 करोड रुपये देय आहेत. विभागाकडून नियमितपणे थकबाकी भागवण्याबाबत जबाबदार अधिकार्‍यांशी चर्चा केली जात आहे.

आईपीएल साखर कारखाना सिसवां कडून गेल्या गाळप हंगामात एकूण 95.98 करोड रुपयांच्या ऊसाचे गाळप झाले होते. कारखान्याकडून शेतकर्‍यांना ऊसाचे 69 करोड 94 लाख 78 हजार रुपये देण्यात आले होते. बुधवारी कारखान्याने एकूण जवळपास 2300 शेतकर्‍यांचे चार करोड 66 लाख 82 हजार रुपये भागवले आहेत. कारखान्याकडून भागवल्या गेलेल्या बाकीमुळे आता 21 मार्च पर्यंत ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे, तर उर्वरीत 21 करोड 37 लाख 22 हजाराची शेतकरी वाट पाहात आहेत. जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांनी सांगितले की, कारखान्याकडून थकबाकी भागवून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. संपूर्ण थकबाकी भागवण्याबाबत चर्चा सुरु आहे.

साखर कारखान्याने भागवली थकबाकी हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here