ऊस थकबाकी न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

सीतापूर : ऊसाची थकबाकी न मिळाल्याने शेतकर्‍यांची अवस्था खूपच तंग आहे.  शेतकर्‍यांची शेती, शेतीची तयारी यामध्ये अडचणी येत आहेत. लग्न आणि इतर खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकर्‍यांना पाच एप्रिलपर्यंतचे बिसवा कारखान्याने पैसे दिले आहेत. पण उर्वरीत पैसे अजूनही देय आहेत. खात्यामध्ये पैसे येण्याची वाट पाहणारे शेतकरी असंख्य आर्थिक अडचणींशी लढत आहेत. साखर कारखाना थकबाकी भागवण्यात खूपच विलंब करत आहे.  गेल्या वर्षी यावेळेपर्यंत पूर्ण पैसे मिळाले होते. शेतकर्‍यांच्या समोर घरगुती खर्चाशिवाय शेतीचा खर्चही आहे. पैसा न मिळाल्याने काम सुरु होत नाही. शेतकऱ्यांनी सांगितले की, ते नगदी पीकांची लागवड यासाठी करताता की त्यांना पैसा मिळेल. पण यावेळी पैसे भागवण्यात खूपच विलंब होत आहे. उसामध्ये यूरिया, कीटकनाशक फवारणी करायची आहे. पण पैसा नसल्याने हे काम थांबले आहे. मजूर रोख पैसा मागतात.

ऊस  महाव्यवस्थापक डॉ. अनूप सिंह म्हणाले, पाच एप्रिल पर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे साखर कारखान्याने भागवले आहेत. उरलेले पैसे लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवले जातील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here