सितारगंज साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ४.५३ कोटींची बिले अदा

रुद्रपूर : किसान सहकारीसाखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४.५३ कोटी रुपयांची बिले जारी केली आहेत. साखर कारखान्याने आतापर्यंत एक फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. कार्यकारी संचालक राजीव लोचन शर्मा यांनी सांगितले की, सितारगंजमधील ऊस उत्पादकांना १.९० कोटी रुपये, खटीमातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २.५४ कोटी रुपये, हल्दानीतील शेतकऱ्यांना ८९ लाख रुपयांची बिले देण्यात आली आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कार्यकारी संचालकांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा धनादेश ऊस समित्यांकडे देण्यात आला आहे. या हंगामात आतापर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी ४९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत २४,७२,८०० क्विंटल ऊस गाळप करण्यात आले आहे. तर २,३०,२६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here