महाराष्ट्रात आतापर्यंत १५१ साखर कारखाने सुरू

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. साखर आयुक्तालयाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार २२ नोव्हेंबर २०२१ अखेर राज्यात एकूण १५१ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ७४ सहकारी तर ७७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आणि १५५.६२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १३९.०१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.९३ टक्के इतका आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. येथे एकूण ३५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २२ नोव्हेंबर पर्यंत सोलापूर विभागात ३४.४९ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. येथे २८.३५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ८.२२ टक्के आहे.

कोल्हापूर विभागात साखर उतारा १० टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सर्वात जास्त साखर उत्पादन कोल्हापूर विभागातच झाले आहे. विभागात ४३.४४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ४३.८४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here