शेतकऱ्यांनी गाळपास ऊस जाळून आणल्यास पैसे कपातीचा ‘सोमेश्वर’चा निर्णय

पुणे : शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस जाळून आणल्यास बिलातून कपात करण्याचा निर्णय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे. तोडणी, वाहतूक यंत्रणेने ऊस जाळून आणल्यास त्यांच्या बिलातून प्रती टन २०० रुपये कपात केले जातील. तर सभासद, शेतकऱ्यांच्या सहमतीने ऊस जाळून आणल्यास शेतकऱ्यांच्या बिलातून प्रती टन ५० रुपये कपात करण्यात येतील असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप दिला.

अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १२१ दिवसांमध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे. टन एवढी असताना सरासरी प्रती दिन ९ हजार मे. टनाने गाळप करून १० लाख ८४ हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यामध्ये सर्वोच्च सरासरी ११.७४ टक्के साखर उतारा राखत १२ लाख ६७ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील आडसाली ७ लाख ६ हजार मे. टन, पूर्वहंगामी १ लाख १३ हजार मे. टन, सुरु १३,९९५ मे. टन, खोडवा ६५, ४२६ मे. टनाचे गाळप केले असल्याची माहिती जगताप यांनी दिली. चालू हंगामात एक मार्चपासून १५० रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. आता ३,१५० रुपये बिल दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here