हंगाम २०२२-२३ : महाराष्ट्रात ऊस बिले देण्यास गती

पुणे : महाराष्ट्रात गळीत हंगाम २०२२-२३ समाप्त झाला आहे. मात्र, राज्यातील साखर कारखान्यांनी अद्याप शंभर टक्के ऊस बिले (FRP) दिलेली नाहीत. लवकरात लवकर FRP देण्यात यावी, यासाठी राज्यातील साखर कारखाने गतीने प्रयत्न करीत आहेत.

साखर आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिसून येते की, चालू साखर हंगामात २१० साखर कारखान्यांनी गाळपामध्ये सहभाग नोंदवला होता. आणि १५ मे २०२३ अखेर १०५ साखर कारखान्यांनी शंभर टक्के बिले अदा केली आहेत. ७९ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के बिले दिली आहेत. १६ कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के बिले दिली असून १० कारखान्यांनी ० ते ६० टक्के बिले दिली आहेत.

राज्यात या हंगामात ३३,४७७ कोटी रुपये (H&T सह) यांपैकी ३२,२३३ कोटी रुपयांची ऊस बिले (एकूण ९६.२८ टक्के) देण्यात आली आहेत. राज्यातील वास्तविक एफआरपी (Actual FRP) १,२४४ कोटी रुपये शिल्लक आहे.
या हंगामात महाराष्ट्राने १०५३.६६ लाख टन ऊस गाळप करून १०५ लाख टन साखर उत्पादित केली आहे.
राज्यातील ९ साखर कारखान्यांना RRC जारी करण्यात आली आहे. आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्राने ऊस बिले देण्यात शानदार कामगिरी केली आहे.

साखर कारखान्यांकडून देण्यात आलेली FRP

१०० टक्के : १०५ कारखाने
८० ते ९९ टक्के : ७९ कारखाने
६० ते ७९ टक्के : 16 कारखाने
० ते ५९ टक्के : १० कारखाने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here