कोलंबो : श्रीलंका सरकारने महागाई आणि साठेबाजीमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बंदरात अडकलेल्या अत्यावश्यक वस्तूंच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले जातील असा निर्णय कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमिटीतर्फे घेण्यात आल्याची माहिती मंत्री रोहिता अबेगुणवर्धना यांनी दिली.
साथोसाचे अध्यक्ष रियल अॅडमिरल आनंद पीरिस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बंदरात अडकलेला साखरेचा साठा त्वरीत खरेदी करण्याचे आणि तो किफायतशीर दरात जनतेला देण्यासाठी त्वरीत पावले उचलली जातील. पंतप्रधान महेंद्र राजपक्षे यांनी बंदरात अडकलेल्या आवश्यक सामानाचा स्टॉक त्वरीत जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
जीवनावश्यक काद्य पदार्थांना सथोसा आणि आवश्यक खाद्य पदार्थ्यांच्या आयातदारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत वितरित करण्याचे निर्देश मंत्री तुळशी राजपक्षे यांनी व्यापारमंत्री डॉ. बंडुला गुणवर्धने यांना दिले आहेत. रथगामामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री रोहिता अभयगुणवर्धन यांनी सांगितले की, बंदरात अडकलेल्या आवश्यक सामानाची सोडवणूक करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा प्रदान केल्या जातील. कोलंबो बिझनेस असोसिएशनचे सचिव चामिंडा विदनागमेज यांनी सांगितले की, बाजारात कृत्रीम टंचाई निर्माण होत आहे. लोकांनी ग्राहकोपयोगी वस्तूंची साठेबाजी केली असल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचा दावा सचिव विदनागमेज यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link