ऊसाचे पैसे देण्याच्या मागणीसाठी निवेदन

बुलंदशहर : भारतीय किसान युनीयन अंबावतच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि अडचणींबाबत जिल्हा ऊस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिले.

भाकियूच्या विभागाचे मुख्य महासचिव पवन तेवतीया यांनी सांगितले की, साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. मात्र, कारखान्यांकडून पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. आजही काही ठिकाणी शेतांमध्ये ऊस शिल्लक आहे. त्यामुळे कारखान्यांनी तो ऊस खरेदी केला पाहिजे अशी आमची मागणी आहे.

प्रदेश उपाध्यक्ष संतोष, मेरठ विभागाचे प्रभारी सुबे सिंह आणि जिल्हा मुख्य महासचिव सुधीर तेवतीया यांनी सांगितले की, ऊसाची बिले देण्याबाबत सरकारने जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले ते पाळलेले नाही. जर शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here