उस थकबाकी भागवण्याबाबत शेतकरी सेनेचे निवेदन

शामली: भारतीय किसान सेनेच्या पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या उस थकबाकीच्या मागणीबाबत प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या नावाने मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना दिले. ज्यामध्ये त्यांनी शेतकर्‍यांना पैसे न दिल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

गुरुवारी भारतीय किसान सेनेच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रीय प्रवक्ता विक्रांत चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये शामली कलेक्ट्रेट येथे जावून प्रदेशाचे मुख्यमंत्री यांच्या नवाने एक निवेदन एडीएम अरविंद कुमार यांना दिले. ज्यामद्ये त्यांनी सांगितले की, शेतकर्‍याचे देय व्याजासहित द्यावे. जोपर्यंत शेतकर्‍यांना सर्व देय देण्यात येत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांची विज कापू नये. शेतकर्‍यांच्या खाजगी नलकूपांचा विज भार वाढवला जावू नये. यावेळी बाबूराम भंडारी, जगबीर फौजी, जितेंद्र फौजी, राहुल चौधरी, विशाल धामा, मोनू पवार आदी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here