बाजपूर साखर कारखान्यातील अडचणींबाबत ऊस मंत्र्यांना निवेदन

बाजपूर : बाजपूर सहकारी साखर कारखान्यातील कामगार संघटनेच्या सदस्यांनी डेहराडून येथे ऊस मंत्री स्वामी यतीश्वरानंद महाराज यांची भेट घेऊन निवेदन दिले. ऊस मंत्र्यांनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.

बाजपूर सहकारी साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील सद्यस्थितीत अत्यंत कठीण समस्यांतून जात असल्याचे कामगारांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राजकीय हस्तक्षेपासोबतच कारखान्यावर अनावश्यक आर्थिक भार पडला असल्याने कोणताही कर्तव्यदक्ष अधिकारी येथे थांबण्यास इच्छूक नाही. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांचे नुकसान होत आहे. त्यानंतरही कारखान्याकडे लक्ष दिले जात नाही. कारखान्यात यूजेव्हीएनएलच्या सहकार्याने ३५०० टीडीसी क्षमतेचा प्लान्ट आणि २२ मेगावॅट विद्युत प्लान्टची स्थपाना आणि राज्य सरकारकडून को जनरेशन तथा इथेनॉल प्लान्टच्या निर्मितीस लवकर मंजूरी दिली जावी अशी मागणी कामगारांनी केली.

कारखान्यातील मुख्य लेखापालाचे पद रिक्त असून ते तात्काळ भरावे अशी मागणी सदस्यांनी मंत्र्यांकडे केली. कारखान्यातील यांत्रिक विभागातील अति कुशल, कुशल आणि अकुशल रिक्त पदांवर ऑफ सिझनच्या काळात कार्यरत सदस्यांना घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे शाम काटक, धीरज शर्मा, पवन कुमार कुशवाहा, जयप्रकाश, पलविंदर सिंह, कपिल कोछड, गौतम, पी. के. भाटी, बासवानंद जोशी, देवेंद्र बिष्ट, फैयाज आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here