ऊस बिलाच्या मागणीसाठी भाकियूचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हापूड : भारतीय किसान युनियन अराजकीय गटाने सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना ऊस बिले त्वरीत मिळावीत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष अमित तोमर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जाऊ शकत नाहीत.

थकबाकी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीशी झुंज देत आहेत. ते म्हणाले, जर पुढील ३० दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दोन्ही कारखान्यांकडून ऊसाचे पैसे मिळाले नाहीत, तर राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दोन्ही कारखान्यांसमोर निदर्शने केली जातील. या मागणीचे निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here