चांदपूर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा समारोप

बिजनोर : चांदपूर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा आज समारोप झाला आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, परिसरामध्ये सर्व ऊस गाळपानंतर साखर कारखाना बंद झाला आहे.

जिल्हा ऊस अधिकारी म्हणाले कि चांदपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे. साखर कारखान्याने नवा किर्तीमान बनवला आहे, चांदपूर साखर कारखान्याने 66 लाख 44 हजार क्विंटल ऊसाचे गाळप करुन रेकॉर्ड बनवले आहे. गेल्या वर्षी साखर कारखान्याने 56 लाख 20 हजार क्विंटल ऊसाचे गाळप केले होते. गेल्या वर्षी साखर कारखान्याने 6 लाख 54 हजार क्विंटल साखर तयार केली, तर यावळी साखर कारखान्याने 7 लाख 44 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षी साखर कारखान्याची सरासरी रिकवरी 11 पॉइंट 63 टक्के आणि यावेळी 11.64 टक्के राहीली. त्यांनी सागितले की, चांदपूर साखर कारखाना गेल्या वर्षी 10 मे ला बंद झाला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here