शेतकऱ्यांची थकबाकी भागवली जावी

रुडकी : कांग्रेस कार्यकर्त्यानी ज्वाइंट मजिस्ट्रेट च्या माध्यमातून राष्ट्रपति यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांंच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी केली. तसेच शेतकऱ्यांना थकित ऊस बिले लवकरात लवकर भागवली जावीत अशीही मागणी केली.

जिल्हा किसान कांग्रेस कमेटी रुड़की ग्रामीण र्च अध्यक्ष सेठपाल परमार यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी आज अडचणीत आहेत. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे भागवत नाहीत. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

पत्रामध्ये शेतकऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करावे, अतिवृृष्टीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई द्यावी, ऊसाचे बिल भागवावे, पिकांचे दर महागाई नुसार वाढवावे, कोरोना काळात शेतकऱ्यांना रासायनिक खत आणि उर्वरक मध्ये अनुदान मिळावे, सर्व गावांमध्ये मोफत सॅनिटायझर आणि मास्क वाटावे आणि वीज – पाणी बिल माफ करावे अशा मागण्या केल्या आहेत. तसेच डीजेलमध्ये 50 टक्के सूट मिळावी अशीही मागणी केली आहे.

यावेळी महिला कांग्रेस जिल्हा अध्यक्ष तसेच किसान कांग्रेस प्रवक्ता रश्मि चौधरी यांनी सांगितले की, सरकारच्या चुकीच्या नीति मुळे शेतकरी त्रस्त आहेत. याप्रसंगी वीरेंद्र सिंह, आदित्य राणा, बृजपाल सिंह, अल्लादिया, उदय त्यागी, सतेंद्र त्यागी आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here