साखर कारखाना भागवणार ऊस शेतकर्‍यांची थकबाकी

फतेहपूर: ऊस खरेदी केंद्रांकडून ऊस शेतकर्‍यांच्या अपेक्षा आता भंग पावू लागल्या आहेत. गेल्या खरेदी हंगामामध्ये ऊस शेतकर्‍यांचे जवळपास दोन करोड रुपये अजूनही कारखान्यावर देय असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी वाढत आहे. तर साखर कारखान्याने 15 सप्टेंबर पर्यंत ऊस शेतकर्‍यांचे पैसे दिले जातील असे अश्‍वासन दिले आहे.

हैदरगढ साखर कारखान्याकडून जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांकडून ऊस खरेदीसाठी खजुहा, बकेवार, सठिगंवा, नसेनिया, जोनिहा, सैदनपूर, किशुनपुर, धाता एक, धाती बी आणि धाता सी सह 11 खरेदी केंद्र संचलित करुन ठेवले आहेत. ज्यामध्ये जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी साखर कारखान्याला ऊस दिला होता, पण खरेदी बंद झाल्यानंतर आतापर्यंत ऊस शेतकरी कार्यालयात हेलपाटे घातला आहेत. जवळपास दोन करोड रुपयांची थकबाकी कारखान्याकडून अजूनही भागवण्यात आली नाही. यामुळे शेतकरी खरेदी केंद्रांवर आपला ऊस विकण्यास तयार नाहीत. तर हैदरगढ साखर कारखान्याने गेल्या ऊसाचे पैसे 15 सप्टेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांना देवू असे अश्‍वासन दिले आहे. ऊस सचिव जसवंत सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून 15 तारखेपर्यंत सर्व शेतकर्‍यांचे पैसे भागवण्याचे आश्‍वासन दिले आहे. गेल्या हंगामातील सर्व पैसे मिळाल्यानंतरच पुढची खरेदी केली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here