ऑनलाइन बैठकीमध्ये चर्चेला आला उस थकबाकी-विजेचा मुद्दा

अमरोहा: भरातीय किसान संघाची गुरुवारी बैठक झाली.ऊस थकबाकी आणि विज समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

जिल्हा प्रभारी संगीता ठाकूर यांनी पदाधिकार्‍यांना निर्देशित केले की गाव स्तरापर्यंत संघटना गठीत केली जावी. सार्वजनिक समस्यांचे निराकरण केले जावे. जिल्हाध्यक्ष कृष्ण कुमार शर्मा यांनी साखर कारखान्याकडून ऊस थकबाकी वेळेत होत नसल्याबाबत रोष व्यक्त केला. आरोप केला की, शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी सागितले की, किसान संघाने गेल्या काही दिवसात जनपद स्तरावर थकीत ऊस मूल्याच्या प्रश्‍नासाठी निवेदन दिले होते, पण आजपर्यत पैसे मिळालेले नाहीत. विजेच्या कमीचाही प्रश्‍न उपस्थित केला आहे. वंचित शेतकर्‍यांना सन्मान निधी देण्यासाठी आग्रह केला आहे. आरोप केला की, शेतकर्‍यांच्या पिकाचे लाभदायक मूल्य मिळणे दूरच आहे, सरकारकडून घोषित समर्थन मूल्यही मिळत नाही. मक्याला 1800 ऐवजी शेतकरी 1200 रुपये प्रति क्विंटल वर बाजारात विकण्यासाठी विवश झाले आहे. बैठकीत चौधरी नरेंद्र सिंह, चंद्र प्रकाश शर्मा , आलोक चौहान, महिपाल सिंह, विकास त्यागी, नवनीत त्यागी, लाखन सिंह, यशवीर सिंह, मोनू गुप्ता, सचिन शर्मा अणि नीरज प्रजापति आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here