शेतकर्‍यांची ऊस थकबाकी वेळेत मिळावी: दिगंबर सिंह

बिजनौर: जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वेळेत ऊस थकबाकी मिळत नाही. पेट्रोल आणि डीजेलच्या किमती वाढल्या आहेत. शेतकर्‍यांची थकबाकी साखर कारखान्यांनी वेळेत भागवावी, अशी मागणी भाकियू चे युवा प्रदेश अध्यक्ष दिगंबर सिंह यांनी केली.

भाकियू चे युवा प्रदेश अध्यक्ष दिगंबर सिंह म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकर्‍यांहि थकबाकी भागवण्याबाबत विलंब करत आहेत . जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे हे शोषण आता सहन होणार नाही. दिगंबर सिंह यांनी सागितले की, जिल्हाधिकारीही सातत्याने कारखाना अधिकार्‍यांची बैठक़ घेत आहेत. ते म्हणाले, साखर कारखान्यांनी वेळेवर शेतकर्‍याची थकबाकी भागवावी अन्यथा साखर कारखान्यांविरोधात जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करतील. दिगंबर सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील डीसीओ यांनी कारखान्याकडून शेतकर्‍यांची थकबाकी वेळेत मिळवून देण्याचे काम करावे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here