ऊस थकबाकीच्या मुद्दयावरुन आंदोलनाचा इशारा

पीलीभीत: जिल्हा पंचायत सदस्यांनी ऊस थकबाकी सह ६ सूत्री मागण्याचे निवेदन संपूर्णानगर साखर कारखान्याचे जीएम यांना दिले आहे. एका आठवड्यात थकबाकी न भागवल्यास अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

क्षेत्रीय शेतकरी सहकारी साखर कारखाना संपूर्णानगर ने गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांची थकबाकी भागवलेली नाही. अशा मध्ये शेतकऱ्यांजवळ पीक लागवड, खत आणि औषध फवारणी साठी पैसे नाहीत. दूसरीकडे बँक आणि सहकारी सोसायट्यांचे कर्ज न चुकवल्याने डिफॉल्टर होत आहेत. इतकेच नाही तर घरगुती सामान तसेच इतर खर्चासाठी ही त्यांना दाही दिशा भटकावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांचे अंतिम बिल भागवण्यावेळी एक पोत साखर दिली जावी असे धोरण आणले आहे . ज्याचे पैसे साखर कारखाना प्रशासनाने पहिल्या बिलातून कापले आहेत. या सहा सूत्री मागण्यावरुन ट्रान्स क्षेत्रातील जिल्हा पंचायत सदस्य मंजीत सिंह यांनी शनिवारी संपूर्णा नगर साखर कारखान्याच्या जीएम ना निवेदन दिले. एका आठवड्यामध्ये थकबाकी न भागवल्यास धरणे आंदोलनाचा इशाराही दिला आहे. यावेळी पूर्व प्रधान मुजाहिद अहमद, सुल्तान हसन गाजी, जगीर सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here