ऊस माफियांवर कडक कारवाई करावी

सीतापूर, उत्तर प्रदेश: प्रवासी श्रमिकांना सरकारी सहायता उपलब्ध करण्याच्या मागणीबाबात भारतीय मजूर शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शहर मॅजिस्ट्रेट ला निवेदन दिले. निवेदनाच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले की, बंदीच्या दरम्यान दुसर्‍या प्रांतातून गावाकडे परतलेल्या श्रमिकांना सहायता निधी उपलब्ध होत नाही. त्यांना शाळा किंवा घरांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते, त्यांना एकदा सहायता निधी आणि रेशन कीट मिळाले. पण त्यानंतर शासनाकडून दिला जाणारा सहायता निधी त्यांना मिळू शकला नाही.

त्यांनी मागणी केली की, शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे मिळावेत. उर्वरक उपलब्ध केले जावे. ग्रामसभेत बनणार्‍या स्वच्छतागृहांची तपासणी केली जावी. यावेळी जसाचा सर्वे सुरु आहे. सर्व ऊस माफिया सक्रिय आहेत. त्यांच्यावर अंकुश लावला जावू शकतो. ऊस माफियांवर कडक कारवाई व्हावी. निवेदन देताना धीरेंद्र सिंह, रणजीत सिंह, तरुण कुमार आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here