ऊस थकबाकी न भागवणार्‍या कारखान्यांविरोधात होणार कडक कारवाई: ऊस मंत्री

लखनऊ : शेतकर्‍यांच्या प्रलंबित ऊस थकबाकी वर विरोधी पक्षाच्या कडक टीकेनंतर ,उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी ऊस शेतकर्‍यांना 45 दिवसांच्या लॉकडाउन दरम्यान 6,000 करोड रुपये भागवले असल्याचा दावा केला. ऊस मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, लॉकडाउन दरम्यान साखरेच्या विक्रीमध्ये घट होऊनही कारखान्यांकडून शेतकर्‍यांना पैसे देण्यात आले आहेत.

राणा यांनी आगामी गाळप हंगामासाठी ऊस कारखान्यांच्या तयारीबाबत समीक्षा बैठक आयोजित केली होती. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने नव्या परवाना निती अंतर्गत गुर्‍हाळांना 165 परवाने जारी केले आहेत. मंत्र्यांनी साखर कारखान्याला नव्या गाळप हंगामासठी तयार राहायला सांगितले आहे आणि साखर कारखान्यांना लवकरात लवकर आपली थकबाकी भागवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी इशारा दिला की, जर ते थकबाकी भागवण्यात अपयशी ठरले, तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here