साखर कारखान्यांना ऊस थकबाकी भागवण्याचे आदेश 

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांना अजूनही ऊस थकबाकी मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. कारखान्यांसाठी ऊस थकबाकी हा एक खेळ असल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे. यामुळे शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मागणीनुसार, बुलंदशहराच्या ऊस अधिकार्‍यांनी लवकरात लवकर ऊस थकबाकी भागवण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. शेतकर्‍यांचे जवळपास 100 करोड रुपये देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऊस शेतकर्‍यांचे पैसे न देणार्‍या साखर कारखान्यांना डीसीओ यांनी थकबाकी न दिल्यास कडक कारवाई केली जाईल अशी नोटीस दिली आहे. ऊस अधिकार्‍यांनी सांगितल्यानुसार, वेव साखर कारखान्याकडून शेतकर्‍यांचे 36.52 करोड, अनुप शहर साखर कारखान्याकडून 14.25 करोड, सिम्भावली कारखान्याकडून 25.29 करोड आणि ब्रजनाथपूर कारखान्याकडून 24.32 करोड इतकी थकबाकी देय आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here