ऊस दरवाढीसाठी निवेदन सादर

मेरठ : उत्तर प्रदेश किसान सभेच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन सादर केले. उत्तर प्रदेश सरकारकडे ऊस दर वाढीबाबत आणि आपल्या इतर मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उसाचा दर वाढविण्याची गरज आहे. विजेसह कृषी औजारांच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल करण्यात यावा. साखर कारखाने ऑक्टोबर महिन्यात सुरू करावेत, शेतकऱ्यांना ऊस बिले व्याजासह मिळावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवेदन देताना वेदप्रकाश, बिल्लू रामपूर, राजपाल शर्मा, राजेंद्र, जगदीश कोहला, अब्दुल्ला आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here