कच्ची साखर बनवण्यासाठी साखर कारखान्यांना अनुदान

बिजनौर : वेव ग्रुपच्या बिजनौर साखर कारखान्याला कच्ची साखर बनवण्यासाठी जवळपास ३० करोडचे अनुदान मिळू शकेल. ऊस शेतकऱ्यांची थकबाकी देण्यात साखर कारखाने नाकाम झाले आहेत, आता अनुदानाची रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. प्रदेशातील काही इतर साखर कारखान्यांनाही हे अनुदान मिळेल. सरकारने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे . कारखान्यांमध्ये जवळपास ९६०० शेतकरी जोडलेले आहेत . गेल्या गाळप हंगामात कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून १०० करोड रुपयांपेक्षा अधिक ऊस खरेदी केला होता .

आतापर्यंत यापैकी केवळ ४८ करोड रुपयेच शेतकऱ्यांना दिले आहेत . थकबाकी पूर्ण न दिल्यामुळे डीएम कडून कारखान्यांना नोटीस दिली गेली आहे, पण साखर कारखाने आणि संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे . कच्च्या साखरेवर आता साखर कारखान्यांना एक हजार प्रति क्विंटल अनुदान मिळेल. याशिवाय वाहतुकीसाठीही कारखान्यांना अनुदान दिले जाईल .

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here