समारंभांवरील प्रतिबंधाचा साखरेच्या वापरावर परिणाम

कोरोना महामारी मुळे झालेल्या लॉकडाउनमुळे देशामध्ये साखरेचा वापर कमी झाला आहे. सण समारंभांवर प्रतिबंध घातल्यामुळे साखरेचा वापर आणखी काही दिवसांपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे.

चालू साखर हंगामाच्या पहिल्या पाच महिन्यात (ऑक्टोबर 2019 ते फेब्रुवारी 2020) साखरेची विक्री जवळपास 10 लाख टनापेक्षा अधिक होती. मार्च आणि एप्रिल मध्ये साखरेच्या विक्रीवर परिणाम झाला, कारण लॉकडाउनमुळे विक्रीमध्ये 10 लाख टनाची घट झाली होती. याशिवाय गेल्या दोन महिन्यांपासून साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतीवरही परिणाम झाला आहे.

जगभरात कारोनाचा जबरदस्त फैलाव झाला आहे. ज्यामुळे कित्येक देशामध्ये आंशिक आणि पूर्णपणे लॉकडाउन झाले आहे. यामुळे जागतिक साखरेच्या मागणीवर परिणाम झाला आहे. विशेष करुन, भारतामध्ये तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली गेली होती. नव्या टप्प्याअंतर्गत सरकारने रेस्टॉरंटना पार्सलसाठी परवानगी दिली आहे. ज्यामुळे या ठोक ग्राहकांकडून साखरेच्या वापरात वाढ होण्याची शक्यता आहे.

साखरेचा वापर काही महिन्यांपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे कारण सण समारंभांवर प्रतिबंध राहील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here