सर्व ऊस संपल्याशिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत

बिजनौर : जिल्ह्याी सर्व साखर कारखान्यांकडून गतीने गाळप सुरू आहे. आतापर्यंत एकही कारखाना बंद झालेला नाही. शेतकऱ्यांच्या शेतात जो ऊस उभा आहे, तो संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाही असे आश्वासन जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी दिले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकही कारखाना बंद झालेला नाही. पिकाचे उत्पादन चांगले आहे. शेतकरी लवकर ऊस तोडून तो कारखान्याला पाठवत आहेत. काही शेतकऱ्यांकडील ऊस संपला आहे. कामगारांना जादा पगार देऊन उसाची तोडणी सुरू आहे. कारखाने बंद होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह म्हणाले, सर्व कारखाने अद्याप सुरू आहेत. २० मे अखेर कारखाने सुरू राहतील अशी शक्यता आहे.

शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाल्यानंतरच कारखाने बंद होतील. शेतकऱ्यांनी आता नवीन ऊस लागवड सुरू केली आहे. गव्हाचे थ्रेसिंगही सुरू आहे. पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जर पाऊस आला तर नुकसान होऊ शकते असे शेतकरी राजीव चौधरी, लाला, पवन आदींनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here