तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला साखर कारखाना, उस तोलणे बंद

पूरनपूर, उत्तर प्रदेश: दी किसान सहकारी साखर कारखाना तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला आहे, ज्यामुळे उसाचे वजन करण्याची प्रक्रिया ही बंद करण्यात आली आहे. उसाने भरलेल्या वाहनांची मोठी रांग असम हायवे पर्यंत पोचली आहे. केव्हा साखर कारखाना सुरु होईल आणि उसाचे वजन करण्याची प्रक्रिया सुरु होईल याबाबत शेतकरी चिंतेत आहेत.

साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ 16 नोव्हेंबर ला हवन, पूजन करुन करण्यात आला होता. दुसर्‍या दिवशी कारखाना नियमित सुरु ठेवण्याचा दावा अधिकार्‍यांनी केला. पण आठवडाभर साखर कारखाना सारखा बंदच राहिला. तेव्हा अधिकारी उसाच्या कमीचे कारण देत राहिले. चार दिवसांपासून साखर कारखाना नियमित गाळप करत होता.

गुरुवारी दुपारी तीन वाजता बिघाड झाल्याने साखर कारखाना बंद झाला. कारखाना बंद झाल्या झाल्या उसाच्या वजनाची प्रक्रिया थांबवण्यात आली. यामुळे उसाने भरलेल्या वाहनांची मोठी रांग लागली. काहीच वेळात यार्ड भरले. साखर कारखाना कर्मचारी कारखाना आठ तासानंतर सुरु राहण्याची आशा व्यक्त करत होते. पण संध्याकाळी उशिरापर्यंत सुधारणा दिसून आली नाही. चार पाच दिवसांपासून साखर कारखाना क्षमतेनुसार उसाचे गाळप करत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here