जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत साखर कारखाना बंदच राहिल: शेतकर्‍यांचा इशारा

फगवाडा: उस थकबाकी न मिळाल्याने शेतकर्‍यांनी गेल्या 6 दिवसांपासून फगवाडा च्या साखर कारखान्याच्या बाहेर धरणे आंदोलन केले आहे, अजुन कारखाना सुरु झालेला नाही.

शेतकर्‍यांनी इशारा दिला आहे की, जोपर्यंत सर्व थकबाकी क्लिअर होत नाही, तोपर्यंत कारखाना सुरु होवू देणार नाही. शेतकरी मनजीत सिंह राय, सतनाम सिंह साहनी, कुलवंबत संधू यांनी सांगितले की, साखर कारखान्यावर 73 करोड देय आहे. शेतकर्‍यांनी सांगितले की, थकबाकी बाबत स्थानिक प्रशासनाकडून शेतकरी आणि कारखाना व्यवस्थापकांची बैठक करण्यात आली होती. शेतकर्‍यांचे हे धरणे आंदोलन कारखान्याच्या मेन गेटवर अनिश्‍चितकालासाठी सुरु आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांचे जुने देणे भागवले जात नाही, तोपर्यंत शेतकरी धरणे आंदोलन मागे घेणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here