ईराण मध्ये साखर कारखाना कर्मचार्यांचा 48 व्या दिवशीही सरकारच्या विरोधात केलेला संप कायम राहिला. हफ्त तपेह साखर कारखान्याच्या कर्मचार्यांना त्यांची मजुरी मिळालेली नाही आणि कारखान्याला पुन्हा सार्वजनिक करण्याची मागणीबाबत गेल्या 48 दिवसांपासून संप कायम ठेवला आहे. दक्षिण पश्चिमी ईराणच्या शुश मध्ये हफ्त तप्पेह साखर कारखान्याच्या कामगारांना जवळपास तीन महिन्यांची मजुरी न देता 12 जून ला बाहेरचा रस्ता दाखवला होता. कामगार सुधारित नियम आणि अटींसाठी दबाव टाकत आहेत.
साखर कारखान्याच्या कर्मचार्यांचा मुद्दा आता देशामध्ये खूपच गंभीर बनला आहे. याबाबत आता ईराणमध्ये मोठी चर्चा सुरु आहे आणि कामगार सरकारकडून राजीनाम्याची मागणी करत आहेत.