साखर कारखाना कामगारांचा २४ पासून साखळी उपोषणाचा इशारा

बाजपूर : साखर कारखान्याच्या कामगारांचे धरणे आंदोलन २३ व्या दिवशीही सुरूच राहिले. एक जुलैपासून साखर कारखान्यातील कामगार आंदोलन करीत आहेत. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप कामगार संघटनेचे नेते विरेंद्र सिंह यांनी केला.

यावेळी संतप्त झालेल्या कामगारांनी याप्रश्नी साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. शनिवारपासून हे आंदोलन सुरू केले जाईल. कारखान्याचे काम अडचणीत येऊ नये यासाठी देखभाल दुरुस्ती आणि इतर कामांत अडथळे येऊ नयेत यासाठी अशा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गुरमीत सिंह सीटू, मोहन सिंह, विशाल, जुबेर, राहुल, अभिषेक कुमार, फारुख, रजत तिवारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here