साखर कारखान्यांने भागवले 20 करोड रुपये

रुडकी : लॉकडाउन दरम्यान लिब्बरहेडी साखर कारखान्याशी संबंधीत शेतकर्‍यांना थोडा दिलासा मिळाला आहे. साखर कारखान्याने वीस करोड रुपयांची देणी विविध ऊस समितींच्या खात्यामध्ये जमा केली आहे. यामुळे शेतकर्‍यांना 12 फेब्रुवारीपर्यंत पुरवठा करण्यात आलेल्या उसाचे पैसे मिळतील.

ऊस शेतकरी सातत्याने तक्रार करत आहेत की, पूर्ण पीकाची विक्री होवूनही साखर कारखाने ऊसाचे पैसे भागवत नाहीत. यामुळे शेतकर्‍यांच्या समोर आर्थिक संकट उभे आहे. या बाबत ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांच्या कडून साखर कारखान्यांना लवकरात लवकर पैसे भागवण्याबाबत सांगण्यात आले होते. दरम्यान, लिब्बरहेडी साखर कारखान्यांने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, लिब्बरहेडी साखर कारखान्याने 20 करोड रुपयाचे चेक विविध ऊस समितीला पाठवले आहेत. यामुळे कारखान्याशी संबंधीत जवळपास 25 हजार ऊस शेतकर्‍यांना 12 फेब्रुवारीपर्यंत पुरवठा केलेल्या उसाचे पैसे मिळतील. त्यांनी सांगितले की, साखर कारखाना आणि पैसे भागवणे यासाठी प्रयत्न करत आहेत. जस जसे पैशाची सोय होईल, तस तसे शेतकर्‍यांचे पैसे भागवले जातील. साखर कारखान्याने 14 मे ला गाळप बंद केले आहे. यापूर्वी 25 एप्रिल ला इकबालपूर साखर कारखाना बंद झाला. जनपद मध्ये केवळ लक्सर साखर कारखानाही सुरु होत आहे.

ऊस विभागाकडून ऊस क्षेत्रफळाचे सर्वेक्षण सुरु केले आहे. लिब्बरहेडी साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, शेतकर्‍यांशी सातत्याने संपर्क केला जात आहे. शेतकर्‍यांना सांगितले जात आहे की, सर्वेच्या दरम्यान शेतावर राहा, जेणेकरुन पुढील गाळपात त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here